नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकार लवकरच शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा करणार आहे. या वर्षी ३० जूनपर्यंत सरकार कर्जमाफीचा निर्णय घेईल, अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.
शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी लागू करण्यासाठी सरकारने एक समिती स्थापन केली होती. कृषी मंत्र्यांनी माहिती दिली आहे की सरकारला लवकरच त्याचा अहवाल मिळेल. कर्जमाफीच्या बाबतीत परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात कर्जमाफीबाबतचा अहवाल आम्हाला मिळेल. तो अहवाल मिळाल्यानंतर, आम्ही मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यावर चर्चा करू आणि ३० जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीबाबत निर्णय घेऊ, असे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले.
प्रिय भगिनींना ६,००० रुपये मिळतील, यादीत नाव पहा
कर्जमाफी कोणत्या पद्धतीने लागू करावी हे ठरवण्यासाठी प्रवीण परदेशी समिती स्थापन करण्यात आली. या समितीचा अहवाल एप्रिलमध्ये सरकारला प्राप्त होईल. अतिवृष्टीमुळे बाधित तालुक्यातील शेतकरी आणि इतर थकबाकीदारांना या निर्णयाचा फायदा होईल. राज्यातील कर्जमाफीच्या नवीन निर्णयामुळे सुमारे २४ ते २५ लाख शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. या शेतकऱ्यांचे एकूण ३५,४७७ कोटी रुपयांचे पीक कर्ज थकलेले आहे. या पार्श्वभूमीवर, सरकारने कर्जमाफी योजनेला अंतिम स्वरूप देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. गेल्या काही वर्षांपासून अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट आणि https://onlinemahiti.in/ बाजारभावातील चढउतार यामुळे राज्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती बँका आणि राष्ट्रीयीकृत बँकांकडून घेतलेले पीक कर्ज थकले आहे.